Saturday, December 28, 2024

या रोजनिशीबद्दल...


ही रोजनिशी आहे शेतीप्रश्नाशी जोडलेल्या काही जणांच्याकाम करताना येणाऱ्याअनुभवांची.
ही "जणंकोणहे आत्ता येथे मांडण्याची गरज नाहीते प्रत्येकाच्या अनुभवाच्या मांडणीतून पुढे येत जाईलचपरंतु इतके मात्र आत्ता सांगता येईल की शाश्वतसमन्यायी व शोषणमुक्त लोकशाहीवादी समाजाकडे वाटचाल करताना शेतीपद्धतीचीसुद्धा त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे या विचाराने काम करणाऱ्या सर्वांची ही रोजनिशी आहे.

Tuesday, April 30, 2024

Before you write


This blog is meant to post 'reflections on our day-to-day experiences' while working on issues related to agriculture. Please do not post any news items, reports or any other material that is irrelevant to the theme mentioned here.
  • Please feel free to post your thoughts with no obligation to any ideology, belief or agenda. The content of posts will be moderated (if necessary) by admin team only for, 'irrelevance to the blog theme', 'abusive language', or 'minor grammatical and layout improvements'.
  • Please use following standards while publishing posts on this blog to maintain uniformity:

Saturday, March 25, 2017

शेतमालाचा भाव आणि ग्राहकांची मानसिकता


बच्चुभाऊच्या शेतातली संत्री विकण्याच्या निमित्ताने आज ८ दिवसांपासून पुण्याच्या मार्केट यार्डात आहे. ग्राहक १०० ला दोन किलो म्हटलं की अडीच किलो देता का म्हणतात, अडीच म्हटलं की तीन ची मागणी. मापात स्वतःहून एक-दोन संत्रा जास्त टाकला तरी अजून एक टाका ची फर्माईश होते. आणि वरून जाता-जाता अजून एक घेवू का खायला म्हणण्याइतका लोचटपणा लोक दाखवतात. आणि हे बहुतांश लोकांच्या बाबतीत. विशेषतः महिला, चाळिशीच्या पुढचे सर्वजन. दोन कारण स्पष्ट वाटतात, एक, बाजारात बसलेल्या माणसाबद्दल निर्माण झालेला प्रचंड अविश्वास. समोरचा माणूस शक्य तितकं आपल्याला कमी देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे निघेल तितकं काढू ही मानसिकता. आणि दुसरं महत्वाचं कारण वाटतं ते म्हणजे, शेतकऱ्यांपासून असलेल्या अंतरामुळे निर्मांण होणारी स्वाभाविक असंवेदनशिलता. ग्राहकाला फक्त व्यापारी आणि निघेल तितकं काढण्याचा खेळ दिसतो. त्यामुळे शेतकऱ्याला हा माल तयार करायला किती खर्च आला असेल? त्याला या भावात विकलेलं परवडत असेल का? असे प्रश्नच खूप कमी लोकांना पडत असतील असं वाटतं. आणि ग्राहकाच्या बाजूने असणारी आर्थिक निकडही याला जबाबदार असेल का? तर असं दिसतं की हे प्रकार खूप गरीब वर्गातला ग्राहक करतो असं नाही. उलट वर उल्लेख केलेला "लोचटपणा"चा प्रकार मला मध्यमवर्गीय वयस्क लोकांमध्येच अधिक आढळला; अगदी असे लोक ज्यांची मुलं आयटी कंपन्यांमध्ये काम करतात. यापुढे जाऊन हेही खरं की, अगदी खूप पैसेे कमावणाऱ्या घरातील लोकांनाही जमेल तितकं वाचवायची गरज वाटत असेल. पण इतक्या टोकाच्या गरजा आल्या कुठून? बहुतेक सर्वांना मोठं घर, गाडी अशा गोष्टी गरजा वाटतात, त्यामुळे कितीही प्रमाणात असलेला पैसा कमीच भासतो. एकूण शेतमालाची ग्राहक अधिक, रास्त किंमत मोजायला का तयार नाही यामगच्या एका गुंतागुंतीच्या समीकरणाचा काहीसा अंदाज येतो.

Thursday, March 3, 2016

Nagpur Seed Festival 2016 – Report


The 'Nagpur Seed Festival', which is taking shape with the desire to break the traditional form of discussions and lectures, and be an event that is more problem-oriented and connecting the actual stakeholders, took place at Vinoba Vichar Kendra, Nagpur during 19, 20 and 21st February 2016.
We know about Nagpur seed festival since last three years for some or the other reason. On one hand, the agro-industry giants like Monsanto are looking forward to take control of our food by monopolizing food market. Monsanto is looking forward to spread it's arms in India by initiatives like proposed giant seed hub in Vidarbha region. At the same time the common people are coming together and trying to build a people's movement to reiterate their food sovereignty by means of conservation of local seeds, creating awareness about agro-toxics and asking for safe food. One of those small efforts is 'Seed Festival' that is taking place in Nagpur since last four years. This is the brief summary of the happening in this festival.

नागपूर बीजोत्सव २०१६ - लेखाजोखा


केवळ चर्चा आणि भाषणांचे स्वरूप मोडून प्रत्यक्ष प्रश्नाभिमूख, लोकांशी जोडणारा कार्यक्रम कसा आयोजीत करायचा या ध्यासाने आकार घेत असलेला 'नागपूर बीजोत्सव' दिनांक १९, २० आणि २१ फेब्रुवारी २०१६ दरम्यान विनोबा विचार केंद्र, नागपूर येथे पार पडला.मागील ३ वर्षापासून वेगवेगळ्या निमित्ताने आपला 'बीजोत्सवा'शी परिचय आहेच. एकीकडे मोन्सॅंटो सारख्या राक्षसी कंपन्या बियाण्यांचे उत्पादन आणि वापरावर एकाधिकारशाही निर्माण करू पाहत आहेत. विदर्भात होऊ घातलेल्या महाकाय बियाणे केंद्रासारख्या व्यवस्थांनी देशात आपले जाळे पसरू पाहत आहेत. याच वेळी पारंपारिक बियाणे जतन करून शाश्वत शेतीचा शेतीचा प्रसार करण्याचा, तसेच जास्तीतजास्त लोकांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समजवून सांगत विषमुक्त अन्न मिळविण्यासाठी लोक आपल्या पातळीवर एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लोकलढा उभारू पाहत आहेत. अशाच प्रकारचा एक प्रयत्न म्हणजे 'नागपूर बीजोत्सव'. या कार्यक्रमाचा हा संक्षिप्त अहवाल.

Monday, February 1, 2016

ब्राझीलमधील लोकलढा, आजच्या जागतिक प्रश्नांचा चेहरा आणि दुसरा आंतरराष्ट्रीय 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' वर्ग आॅक्टोबर २०१५

गणेश बिराजदार, धरामित्र वर्धा

[सुचना : प्रस्तुत लेख हा विस्तृत शोधनिबंध नसून पावरपाॅंइट प्रेसेंटेशनच्या साह्याने केलेल्या मांडणीचा सारांशलेख आहे . येथे दिलेली माहिती आणि आकडेवारी प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षा वेगळी असू शकते, त्यामुळे आवश्यक तेव्हा ती इतर स्त्रोतांमधून पडताळून घ्यावी (जरी बहुतेक आकडेवारी ही विविध शोधनिबंधांमधून पडताळणी केलेली आहे, आणि संबंधीत शोधनिबंधांचा संदर्भ जोडलेला आहे). येथे संदर्भ जोडलेले शोधनिबंध इतकेच दर्शवितात की, संबंधीत मुद्यांवर अधिक माहितीसाठी वाचकाच्या माहितीस्तव ते जोडले आहेत, मात्र त्यांचा विस्तृत अभ्यास या लेखासाठी केला गेलेला नाही. लेखातील बहुतांशी माहिती ही पोर्तुगीज भाषिक ब्राझीलमधील घडामोडींसंदर्भात असल्यामुळे बरेच संदर्भलेख हे पोर्तुगीज भाषेत आहेत, मात्र पोर्तुगीज लेखांचे चांगले इंग्रजी भाषांतर गुगलच्या साहाय्याने होऊ शकते.]

चाैकट १

दिनांक २६ आॅक्टोबर ते १२ डिसेंबर या दरम्यान ग्वारारेमा, ब्राझील येथे, 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा सात आठवड्याचा वर्ग पार पडला. या वर्गाचा उद्देश, त्याची पार्श्वभूमी आणि त्यातून एक प्रशिक्षणार्थी म्हणून माझे झालेले शिक्षण याची मांडणी या लेखात केलेली आहे.

Monday, July 6, 2015

"खोली" हरवलेली शेतं..

आज सकाळी-सकाळी धरामित्र च्या शाश्वत शेती प्रकल्पाचे समन्वयक, आमचे कोंबे काका येवून एक अनुभव सांगतात, “गणेश, आज एका शेतकऱ्याकडे गेलो होतो. त्याच्या शेतात गेल्यावर तो म्हणाला, साहेब मला कळत नाही, शेजारच्या तीन फलाटात लावलेली ज्वारी उगवून आली, पण या फलाटातली तुम्ही दिलेली ज्वारी मात्र उगवून नाही आली. बहूतेक बियाणं खराब निघालं.” कोंबे काकांनाही प्रश्न पडला, असं कसं काय झालं. पण इतक्यात त्यांचं या गोष्टीकडे लक्ष गेलं की, ज्या शेेतातील ज्वारी उगवून आली नाही, तिथे जमिनीत चिरे पडलेले दिसत नव्हते. त्यांनी शेतकऱ्याला विचारलं, “तुम्ही ह्या फलाटात वखरामागे (शेतातील गवत काढण्याचे अवजार) पेरणी केली ना?” शेतकरी, “हो, तुम्हाला कसं काय कळलं?” तेव्हा कोंबे काकांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की काकरीमागे (पेरणीच्या पुढे-पुढे, बी खोल जावे यासाठी चिरा पाडणारे अवजार) पेरणी केली तर ती पुरेशी खोल जाते, पण वखरामागे ती केली तर पुरेशी खोल जात नाही. त्यामुळे बियाण्याला पुरेशी अोल मिळत नाही. पण शेतकऱ्याने जिथे चांगले उगवून आले नाही त्या ठिकाणी गवत खूप आलेले होते म्हणून काकरीमागे पेरणी करण्याएेवजी थेट वखरामागे पेरणी केली. त्यामुळे ज्या भागांमध्ये काकरीमागे पेरणी झाली होती तेथे ज्वारी उगवून आली व दुसरीकडचे पिक मात्र वाया गेले. हे सांगता-सांगता कोंबे काकांनी बियाणे पेरणीसाठी एक मोलाचा ढोबळ नियम सांगितला. तो म्हणजे, “खोलीत टाक, पण 'अोली'त टाक.”